शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडायला नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:08 IST

सातारा : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टा च्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाचे प्रशासन योग्यरीत्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप केला. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वकिलांनी आपली मते परखडपणे व्यक्त केली. न्यायव्यवस्थेबाबत उघडपणे बोलणे हे धक्कादायक आहे. तर काहींनी हा वाद अंतर्गत आपापसात मिटवावा. न्यायव्यवस्थेमध्ये सामाजिकीकरण आणू ...

सातारा : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाचे प्रशासन योग्यरीत्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप केला. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वकिलांनी आपली मते परखडपणे व्यक्त केली. न्यायव्यवस्थेबाबत उघडपणे बोलणे हे धक्कादायक आहे. तर काहींनी हा वाद अंतर्गत आपापसात मिटवावा. न्यायव्यवस्थेमध्ये सामाजिकीकरण आणू नये, अन्यथा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, अशी भीतीही वकिलांनी व्यक्त केली.न्यायव्यवस्था ही भारतीय लोकशाहीचा स्तंभ आहे. या स्तंभावरच लोकांचा विश्वास राहिला आहे. बाकीच्या ठिकाणचा कमी होत चालला आहे. आणि त्याच संस्थेमध्ये जर असे प्रकार व्हायला लागले तर या गोष्टीचा परिणाम न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडण्यावर होईल. त्यानंतर लोकशाहीला व कायदे पाळण्याला आणि न्यायव्यवस्थेला हे सगळे हानिकारक आहे. हे प्रकार आपापसात मिटविले गेले पाहिजेत. त्याचे सामाजिकरण होऊ नये, अन्यथा हे न्यायव्यवस्थेला हानिकारक होईल.- अ‍ॅड. अशोक जाधव,जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्षन्यायव्यवस्था ही चौथा आणि अतिशय विश्वासू स्तंभ आहे. आजही भारतामध्ये न्यायव्यवस्थेला आदर आहे, असे असताना न्याय व्यवस्थेविरोधात पत्रकार परिषद घेऊन टीका करणे असमर्थनीय आहे.तसेच ही न्यायव्यवस्थेसाठी धक्कादायक बातमी आहे.- अ‍ॅड. चंद्रकांत बेबलेसातारा.सर्व न्यायमूर्ती प्रचंड अनुभवी आहेत. त्यांची अतंर्गत घुसमट ही शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांपुढे मांडली. याचा येणाºया काळात खूप परिणाम होणार आहे. हा विषय संपणे गरजेचे आहे. नाहीतर कुणाचाही न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही. हे लोकशाहीला मारक होईल.- अ‍ॅड. संग्राम मुंढेकर,साताराभारताच्या संविधानाने संसद, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि प्रसार माध्यमांना स्वांतत्र दिले आहे. त्यांना त्यांचे काम करत असताना काही हक्क दिले आहे. ते आपापले काम करत असताना संविधानाच्या मूल्यांवर गदा येत असेल तर निश्चित हे लोकशाहीसाठी घातक आहे. व्यवस्थेतील त्रुटी त्यांच्या पातळीवर सोडवायला हव्या होत्या. मात्र तसे झाले नाही हे दुर्देव.-अ‍ॅड. मेघराज भोईटेसातारालोकशाहीत सर्वात जास्त विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायाधीशांनीच न्याय व्यवस्थेबद्दल माध्यमांमध्ये प्रश्न निर्माण करणे खेदजनक आहे. हा प्रकार म्हणजे एकमेकांच्या अंतर्गत कुरघोड्या असण्याची शक्यता आहे. त्या चव्हाट्यावर यायला नको होत्या. यामुळे सर्वसामान्यांपुढे न्याय व्यवस्थेबाबत वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.-अ‍ॅड. मुकुंद सारडासातारा